पानिपत वाचण्यापूर्वी ह्या युद्धाबद्दल काहीबाही कल्पना होत्या (आपल्या बरयाच जणांचे असेच मत असेल) की पेश्व्यांची राजवट, "भाऊंची कर्तबगारी (किंबहूना त्याची ना-कर्तबगारी) वगैरे वगैरे.. हि कादंबरी वाचल्यानंतर मात्र हे सगळे गैरसमज कुठ्ल्याकुठे पळुन जातात.
कादंबरीकार विश्वास पाटील यांनी एक उदात्त हेतु ठेऊन ह्या क्रुती ची निर्मीती केली आहे.. "पानिपताच्या युद्धाबद्द्ल चुकीच्या कल्पनांना बाजुला सारण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावा गोळा करणे, आणि सदाशीवराव भाऊंच्या कर्तुत्वाला उजाळा देणे." या दोन्ही हेतुंमधे लेखक पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. यातच त्यांचे यश सामावले आहे.
"पानिपत" ... माझ्या मते, आधुनिक मराठी साहित्यातील एक अप्रतिम साहित्यक्रुती असेच ह्या ऐतिहासीक कादंबरीचे वर्णन करावे लागेल. ह्या कादंबरी ची संकल्पना / विषय, ह्या विषया वरील संशोधनाची लेखकाने घेतलेली कष्टप्रद जबाबदारी, कादंबरीची मांडणी, सदाशिवराव भाऊंच्या चरीत्राचे सार्थ चित्रण - सारंच कसं - कौतुकास्पद.
मराठ्यांचे पानिपत होण्याची खरी कारणे : भाऊंचे चुकीचे निर्णय, मराठी वीरांचा पळपुटेपणा, नव्हे तर पेशव्यांचा देवभोळेपणा, अंतर्गत दुही व असंतोष (रघुनाथ दादा, मल्हारराव होळकर, व ईतर हितचिंतक यांच्या क्रुपेने ) आणि नजीबाचे कुटील आणि यशस्वी कारस्थाने हेच होत. पेशव्यांचा देवभोळेपणा - हा विषेश नोंद केलेला आहे.. सदाशीवराव भाऊंच्या सैन्याबरोबर पेशव्यांनी ५०००० भाविक (पन्नास हजार मात्र !) पाठवलेले होते. "ऊत्तरेत जातच आहात तर ह्या लोकांना काशी चे दर्शन घडवुन आणा" असा पेशव्यांनी आग्रह केला. जेव्हा यास विरोध दाखवला, तेव्हा त्यांच्या वीरत्वावर शंका घेण्यात आली.
Monday, November 27, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment